डॉ. सुब्बाराव यांनी स्थापन केलेल्या इपीआरएफ या संस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने सुहास खांबे यांनी साखर कारखाने व डिस्टीलरी यांच्या सांडपाण्यावर मूलभूत संशोधन करून वालचंद कॉलेजमधून मायक्रोबायॉलॉजीमध्ये पीएचडी प्रकल्प पूर्ण केला. नंतर ज्ञानदीपच्या सौ. शुभांगी रानडे यांच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये सुयश कॉम्प्युटर्स ही संस्था चालवून संगणक प्रशिक्षणाचे काम केले. स्वतःची निखिल अनॅलिटिकल लॅब उभारून पाणी, माती व अन्नपदार्थ तसेच शेतीसंबंधित जीवाणू खते व वनस्पतींवरील रोग नियंत्रणाविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहेत. नवसंशोधनासाठी स्थापन झालेल्या सिस्टेड फौंडेशनचे ते कार्यवाह आहेत. १९८१ पासून विविध सार्वजनिक संस्थांत शैक्षणिक व संशोधन कार्यात ज्ञानदीपचे डॉ. सु. वि. रानडे यांचेबरोबर सतत कार्यमग्न राहून आता यापुढे ज्ञानदीपच्या शेतीविषयक नव्या प्रकल्पाचे नेतृत्व करणार आहेत